एवढ्या जगात माय मानतो मराठी..!मराठी भाषेवर असणार्‍या प्रेमापोटी सर्व मराठी बांधवांच्या भेटीस हा नजराणा..!आपण समृद्ध होवूयात, भाषा समृद्ध करुयात..!



Blog Image

IMAGE COURTESY : Source

Source: Facebook

आपल्या कर्माने पुण्यात्वाला पोचलेल्या अहिल्याबाई

सुभेदार.....

आपल्या कर्माने पुण्यात्वाला पोचलेल्या अहिल्याबाई होळकर सर्वांना माहित आहेत पण त्याच होळकर घराण्याचे मूळपुरुष असणाऱ्या मल्हारराव होळकर तसे फारच कमी लोकांना माहिती आहे.

मल्हाररावांनी दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरू केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली.

मल्हारराव होळकर व राणोजी शिंदे हे आरंभी जिवलग मित्र होते. उत्तर हिंदुस्तान या दोघांनी गाजवून सोडला. मोगल बादशहाचे सर्व सरदार, वजीर दोहोंना टरकून असायचे. अब्दालीच्या तीन स्वाऱ्या झाल्यानंतर मराठेच आता बादशाहीचे रक्षण करू शकतील एवढा विश्‍वास बादशहाच्या मनात निर्माण झाला होता. तिसऱ्या स्वारीनंतर त्याचे डोळे उघडले आणि त्याच्या सफदरजंग या वजीरामार्फत त्याने कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. (२७ मार्च १७५२) होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी या दोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.

पानिपतनंतर मराठेशाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हाररावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून ते स्वतःला कार्यमग्न ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या.

पेशवेकालीन इतिहास वाचकांना ‘मल्हारराव होळकर‘ हे नाव परिचयाचे आहे. मल्हाररावविषयी फारसे काही माहिती नसले तरी नजीबखानाचा आश्रयदाता व पानिपतच्या लढाईतून पळून जाणार सेनानी हि मल्हाररावाची आपल्या थोर इतिहासकारांनी बनवलेली ‘ इमेज ‘ परिचित अशीच आहे.

पण मुळात संताजी वाघ हा होळकरांचा सरदार आणि जनकोजी आपापल्या सैन्यांसह हुजुरातीपासुन जवळपास तीन किलोमिटर दुर असतांना ते हुजुरातीजवळ का आले असावेत? संताजी वाघाचे प्रेत भाऊजवळ सापडले तर जनकोजी तेथेच पकडला गेला. याचा अन्वयार्थ लेखक संजय क्षीरसागर असा लावतात कि भाऊला रणधुमाळीतुन सुरक्षीत बाहेर काढण्यासाठी मल्हारराव होळकरांनीच दोघांची रवाणगी तिकडे केली होती. त्यामुळेच होळकर आधीच रणांगण सोडुन गेले हा आरोप बाद होतो. या नि:ष्कर्षाला लेखकाने तत्कालीन पत्रव्यवहारांतुनही समर्थन मिळवले आहे व ती प्रकाशितही केली आहेत.

सदर दिलेल्या फोटोमध्ये

नंबर १ ज्या फोटो ला दिला आहे तो होळकरांचा पुण्यातील राहता वाडा (सध्याच्या दृष्टीने त्याचे त्या काळचे स्थान निश्चित सांगणे मुश्कील)

नंबर २ ज्या फोटो ला दिला आहे ती होळकरांची राज मुद्रा

नंबर ३ ज्या फोटो ला दिला आहे ती होळकरांची समाधी ती मध्यप्रदेश मध्ये आहे

नंबर ४ ज्या फोटो ला दिला आहे तो होळकरांचा राजवाडा (१९८४ साली झालेल्या दंगलीमध्ये हा राजवाडा जळला, जो २००७ साली चालू वंशजांनी पुन्हा बांधून काढला आहे) 

Share on:

Comments





Recent Comment's

Name: Pawan Choudhari


Comment: नवीन वाटचालीस मनापासून शुभेच्छा... ???


Related Blogs

×

Subscribe To Newsletter